आज विज्ञान इतके प्रगत झाले आहे की मंगळ ग्रहावर होणा-या कॅंपिंगपासून ते ३डी प्रिंटींगपर्यंत, परिवर्तनाची एक लाट जग
बदलत आहे. पूर्ण जग प्रगत झाले तरीही कृषी जगत अर्थपूर्ण परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे. अनेक उद्योग बदलून टाकणारी
आधुनिक तंत्रे अजूनही भारतातल्या शेतक-यांना माहित नाहीत. म्हणूनच आम्ही भारतीय शेतीचे रूप बदलण्याचा आणि
आपला देश, आपल्या शेतक-यांच्या मदतीसाठी टेक्नॉलॉजीचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही परिवर्तनाचे
एक असे पर्यावरण सुसंगत तंत्र तयार केले आहे, जे बघायला गेलं तर जादूई आहे पण तरीही प्रत्यक्षात त्याचे खूप फायदे आहेत.
आम्ही याला चमत्कार नाही, हा आहे आविष्कार हे नाव दिले आहे.
कृष-ई मध्ये आपले स्वागत आहे. अगणित तास, लाखो कोड्स, हजारो ब्ल्यूप्रिंट आणि अनेक परीक्षणं केल्यानंतर आम्हाला कृष-ई
अॅप तयार करण्यात यश मिळाले आहे. कृष-ई अॅप वापरण्यास सोपे, एक उपयोगी, सर्वात प्रगत आणि वैज्ञानिकरित्या
मान्यताप्राप्त आहे. हे टेक्नॉलॉजीवर आधारित आहे, पण शेतक-यांच्या आयुष्यावरून प्रेरित आहे. कृष-ई अॅप शेतक-यांच्या
गरजेनुसार अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा प्रदान करते, ज्याने शेतक-यांचे प्रति एकर उत्पन्न वाढते. हे कृषी पर्यावरण तंत्रातील
परिवर्तनाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि शेतक-यांचे आयुष्य प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी तयार केले गेले आहे.